शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

वसंतदादांनंतर सांगलीची अवस्था बकाल:रावसाहेब दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 23:15 IST

सांगली : कधीकाळी सांगलीत भाजपला निवडणुकीसाठी उमेदवारांची शोधाशोध करावी लागत होती. पण आता परिस्थिती बदलली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला जनतेने उखडून फेकला असून, दोन्ही पक्षांवर उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. महापालिकेची सत्ता वाटून खाण्यासाठी भाजपविरोधात सर्व एकत्र आले आहेत. वसंतदादांनंतर सांगलीची अवस्था बकाल केल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ...

सांगली : कधीकाळी सांगलीत भाजपला निवडणुकीसाठी उमेदवारांची शोधाशोध करावी लागत होती. पण आता परिस्थिती बदलली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला जनतेने उखडून फेकला असून, दोन्ही पक्षांवर उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. महापालिकेची सत्ता वाटून खाण्यासाठी भाजपविरोधात सर्व एकत्र आले आहेत. वसंतदादांनंतर सांगलीची अवस्था बकाल केल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी केली.येथील भावे नाट्यगृहात भाजप बुथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दानवे बोलत होते. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख, खा. संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, शिवाजीराव नाईक, सुरेश हळवणकर, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार दिनकर पाटील, मकरंद देशपांडे, शेखर इनामदार, नीता केळकर, दीपक शिंदे-म्हैसाळकर उपस्थित होते.दानवे म्हणाले की, सांगली हा वसंतदादांचा जिल्हा आहे. दादांनी सहकार, शैक्षणिक क्षेत्रात भरीव काम केले. पण त्यांच्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादी नेत्यांनी सांगलीची अवस्था बकाल केली. त्यामुळेच आता जिल्ह्याचे चित्र बदलले आहे. दोन्ही काँग्रेसचा वटवृक्ष उन्मळून पडला आहे. सांगलीकरांना शुद्ध पाणी मिळत नाही. अनेक सुविधांपासून नागरिक वंचित आहेत. देशाची, राज्याची हवा कोणत्या दिशेने जाणार, हे महापालिकेच्या निकालावरून स्पष्ट होणार आहे. महापालिकेची सत्ता वाटून खाण्यासाठी, तसेच भांडण नको, म्हणून दोन्ही काँग्रेस एकत्र आल्याची टीकाही त्यांनी केली.राज्यात, देशात जाती-जातीत तणाव निर्माण करून सत्ता मिळविण्याचा काँग्रेसचा डाव आहे. दलित-सवर्णांत भांडणे लावली जात आहेत. दलितांचा सर्वात मोठा शत्रू काँग्रेस आहे. याच काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दोनदा लोकसभेत जाण्यापासून रोखले होते. भंडारा व दादर मतदारसंघात त्यांचा पराभव केला होता. आज राज्यातील १३ महापालिका, १० जिल्हा परिषदा, ८० नगरपरिषदा व पाच हजार सरपंच भाजपचे आहेत. राज्यात भाजपच एक नंबरचा पक्ष असून सांगलीतही भाजपचाच झेंडा फडकेल, असा दावा त्यांनी केला.चंद्रकांत पाटील म्हणाले की, भाजपमधील नाराजांनी नाराजी झटकून पक्षकार्यात सक्रिय व्हावे. भाजप हा विशाल पक्ष आहे. एका ठिकाणी संधी मिळाली नाही, तर दुसऱ्या ठिकाणी मिळते. सांगलीत चांगले नगरसेवक निवडून आले तर शहराचा विकास होईल.सुभाष देशमुख म्हणाले की, महापालिकेच्या सत्तेचा वापर करून काँग्रेस नेत्यांनी स्वत:ची पोळी भाजली आहे. भाजपला सत्ता मिळाल्यास पाच वर्षांत सांगलीचे चित्र बदलू. उमेदवारांच्या पदयात्रा नुसत्या चांगल्या होऊन चालणार नाही, तर त्यांचे मतात रूपांतर होण्यासाठी कष्ट घ्या. बोगस मतदान रोखण्याची जबाबदारी बुथ कार्यकर्त्यांची आहे. या निवडणुकीत भाजप ६० पेक्षा अधिक जागा जिंकेल, असे त्यांनी सांगितले.यापूर्वीच्या आमदारांनी : काय केले?सांगली, मिरजेतील भाजपच्या आमदारांनी ५८ कोटींचा निधी आणला. यापूर्वीच्या आमदारांनी सांगलीसाठी किती निधी आणला? असा सवालही दानवे यांनी उपस्थित केला. राज्याची, देशाची तिजोरी भाजपच्या हाती आहे. त्याला कमळाची चावी लागते, घड्याळाची चावी बसत नाही, असा टोलाही त्यांनी लगाविला.एका व्यासपीठावर याभाजपला थापा मारणारे सरकार म्हणून हिणवले जात असल्याचा उल्लेख करीत दानवे म्हणाले की, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकाच व्यासपीठावर यावे. त्यांनी ६८ वर्षांत काय केले व आम्ही चार वर्षांत काय केले, हे एकदा होऊनच जाऊन दे, असे आव्हान त्यांनी दिले.